पुढारी




सफ़ेद पोषाख घालुन,
सरकारी गाडीतन फ़िरायचं
दुनिया सलाम करते तेव्हा,
मोकळेच हात हलवुन,
उगा आपलं आश्वासन द्यायचं

आपल्याला कुठे काय येतं
चार ईयत्ता शिकलेली असतात,
त्यांनाच गोड बोलुन घ्यायचं 
सारं काम त्यांनाच लावायचं.
 
 भत्ता आपला चालुच असतो,
पार्ट्या करुन मस्त रहायचं,
पण भाषण देताना मात्र,
गरीबीचं पाढं वाचायला शिकायचं.

काम करायचं काहीच नसतं
पण स्टंटमधुन ते दाखवायचं असतं
कधीमधी मोर्चे काढयचे,आंदोलन करायचं.
महिनाभर गाजावाजा करण्यास
मिडियावाले असतातच.

जे 70 वर्षात बदललं नाही
ते आपल्या घाडीभर प्रवासात
काय बदलनार? ढेकळं.....?
 







------ S.V.Godase Blogger Widget

No comments:

Post a Comment

Thanks