Spirit of Life


    प्रत्यकजण आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी दिवस-रात्र धावपळ करत असतो. परंतु हे करताना आपण विसरलेलो असतो कि सुख.. किंव्हा आनंद हा आपल्या मनाच्या समजुतीवर अवलंबुन असतो. ज्या मनात आपेक्षा जास्त तिथे त्या परिपुर्ण न होण्याच दु:खच कायम राहतं, म्हणुनच गौतम बुद्धांनी मानवी आयुष्यातील दु:खाच करण एकाच वाक्यात लिहुन ठेवले आहे. ते म्हणजे-

"Hope is the root cause of unhappiness."

      आशा आणि अपेक्षा हेच खर दु:खाच मुळ करण आहे. परंतु आता आयुष्यात काहीच आपेक्षा ठेवु नये का...?

  तर असं काहिच नाही. आशा आणि अपेक्षांनी भरलेली स्वप्न पाहुन ती सत्यात आनण्यासाठी धडपड करणं हेच तर खरं आयुष्य आहे. परंतु हे करत असताना नेहमीच फलप्राप्तीची किंवा यशाची अपेक्षा ठेवु नये, तुम्ही केलेले प्रयत्न जर तुमच्या मनापासुन निर्भेळ असतील तर यश अपोआप तुमच्याकडे येते. पण यदाकदाचित  हिच केलेली धडपड कधी-कधी निषफळ ठरते आणि आपण हताश होतो, प्रयत्नाची पराकाष्टा करणारे आपण आणि आपले मनही खचुन जाते. तेंव्हा करायचं काय?  स्वताला सावरुन नव्याने ऊभे रहाणे तर गरजेचे असते. त्यासाठी इथे एक अमेरिकन लेखक 'जोन डेरिअन' याची कविता आठवते. हि कविता आपल्या मनाला खुप मोठ धैर्य आणि हिम्मत देते.


To dream the impossible dream,
to fight the unbeatable foe,
to bear with unbearable sorrow,
and to run where
the brave dare not go


स्वप्न पहायच असेल तर असं स्वप्न पहा कि जे आजपर्यंत कोणी कधीही सत्यात उतरवु शकले नाही, 

लढायच असेल तर अशा शत्रुशी लढा कि ज्याला कोणी आजपर्यंत हरवु शकले नाही. 

सहन करायचं असेल तर असं दु:ख सहन कराण्याची क्षमता स्वत:मधे निर्माण करा कि जे कोणाच्याही सहनशक्तीच्या पलिकडे असह्य आहे.

आणि आयुष्यात अशा ठिकाणी धाव घ्या कि जिथे शुरविर देखिल जायला घाबरतात.


to right the unrightable wrong,
and to love pure and chaste from afar,
to try when your arms are too weary,
to reach the unreachable star:
this is my quest.

आयुष्यात अशा चुका सुधारा कि ज्या कधीच कोणी सुधारु शकले नाही.

आणि एकमेकावर असं प्रेम करा कि जे तुमच्या अंतकरणापसुन शुद्ध , निर्भेळ आणि वासनाहिन असेल.

आयुष्यात काही प्रयत्न करायचे असतील तर खरे प्रयत्नांना तेव्हाच सुरवात करा जेव्हा तुमचे हात थकलेले असतील.

आणि अशा एका ऊंचीवर पोहचा कि जिथे अवकाशाचा शुभ्र तारा देखिल पोहचू शकत नाही. this my Quest.

हा माझा दिर्घकाळाचा शोध सुरु आहे. 

To follow that star
no matter how hopeless,
no matter how far,
to fight for the right
without question or pause,


त्या उज्वल भविष्याकडे जाण्यासाठी सज्ज व्हा

ते किती दुर आहे किंवा निरर्थक आहे याचा काहीच संबध नाही

मनात काहीही शंका न ठेवता न दमता, जे योग्य वाटते त्यासाठीच लढा .


to be willing to march, 
march into hell
for that heavenly cause

त्या सफ़लतेकडे जाण्यासाठी ईर्शेने तयार व्हा,

मग भले तुम्ही नरकात गेला तरी तुमच्या जाण्याने तिथे स्वर्गच बनेल. 

शेवटी कवी म्हणतो....!

And I know

if I’ll only be true
to this glorious quest
that my heart
will lie peaceful and calm
when I’m laid to my rest
and the world will be
better for this
:


आणि मला पुर्ण खात्री आहे.

कि जर त्या वैभवशाली शोधासाठी, माझे प्र्यत्न खरे असतील

तर मी माझ्या निश्चीत ठिकाणी गेल्यावर 

माझे ह्रुदय देखिल निर्मम, शांत आणि संतुष्ट असेल.



And the world would be better for this
That one man scorned and covered with scars
Still strove with his last ounce of courage
To reach the unreachable
The unreachable
The unreachable
Star


 आणि ते जगही त्या माणसासाठी तितकेच सुंदर असेल.

जो माणुस अनेक यातना आणि तिरस्काराच्या डागांनी झाकुन गेलेला आहे.

पण तरिही त्या अश्यक्य अशा ठिकानी पोहचण्यासाठी, 

त्याची धडपड हि शेवटच्या धाडसासाठी चालुच असेल.

 ***



-- Lyrics by Joe Darion
music by Mitch Leigh

“Mad men are children of God.”
Dale Wasserman




Blogger Widget

'Class of 83'



  'Class of 83' 
     
 जुनी मुंबई आणि इथे घडून गेलेल्या गुन्हेगारी जगताच एक अफ़लातुन आणि वास्तववादी नाट्य पहाताना  जाणवले कि आता Bollywood हे Entertainment च्या विळख्यातुन बाहेर पडते आहे, आणी पुन्हा वास्तवदर्शी कहीतरी आकार घेते आहे. तसे पाहीले तर 20 व्या शतका नंतरच Bollywood ने आपले रुप पालटले, देवदास, लगान, स्वदेश, गैंग्स ओफ़ वसेपुर, दंगल, आर्टिकल 15, मसान, अ वेन्सडे, अश्या अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती झाली आणि अनेक नवोदीत दिग्दर्शकही तयार झाले.
 
   'Class of 83'  हा क्रिईम जर्न्यालिस्ट व लेखक 'हुसेन झाईदी' यांच्या त्याच नावाने असलेल्या वास्तववादी कादंबरीवर आधारीत आहे, व याचे दिग्दर्शन 'अतुल सभरवाल' या नवोदीत पण गुणी दिग्दर्शकाने अत्यंत चागल्या पध्दतीने केले आहे. विषयाची मांडनी, सिनेमाटोग्राफी, सिन-सिक्वेन्स, एडीटींग, कलर ग्रेडींग सर्वच गोष्टी अंत्यंत लक्षपुर्वक हताळलेल्या आहेत. त्याचबरोबर 'बॉबी देओल' या मुरलेल्या अभिनेत्यासह सर्वच नव्या-जुन्या कलाकारांचा अभिनय देखिल वाखानण्याजोगा आहे.
 

 

 हि स्टोरी आहे 1980 सालची. जेव्हा मुंबईमध्ये गुन्हेगारी जगताचं जाळ पसरलं होतं, आणि ते तोडण्यासाठी पोलिसांची नामुश्की झाली होती. करण पॉलिटीक्स मधील अनेक बडे राजकारणी देखिल यामधे जोडले गेलेले होते.
याची सुरुवात होते ती नाशिकमधील पोलिस ट्रेनिंग सेंटरमधुन, पोलिस भरती झालेले काही नवोदीत तरुण आपल्या डिनच्या प्लानिंग प्रमाणे एक ग्रुप तयार करुन हे गुन्हेगारीच जाळं तोडण्यात यशस्वी होतात। त्याची त्यांना जाणिवपुर्वक किंमतही मोजावी लागते. परंतु एकुनच क्षणा-क्षणाला हे उत्कंठा वाढवनारं नाट्य पहाताना
मनाला भिडनार्या वास्तवाचा एक अस्सल अनुभव देउन जाते.
 
शहारुख खानच्या "Red Chilly Entertainment' द्वारे तयार झालेला हा सिनेमा 'Netflix' वरती प्रदर्शित झाला आहे.  सिनेमाची आवड असनार्या प्रत्यकाने हा नक्की पहावा.
 
   





------ S.V.Godase Blogger Widget

व्हि. शान्ताराम यान्चा - सरताज



आज कालच्या नव्या पिढीला जुने चित्रपट - जुनी गाणी फारशी माहीत नसतात.किंवा माहिती असली तरी त्यामध्ये 
फ़ारसे स्वरस्या दिसत नाही. रिमीक्स, डि.जे. च्या ग्ल्यॉमर दुनियेत सारेजन गुरफटुन जात आहेत. परन्तु अनेक जुने भारतीय चित्रपट याच ग्ल्यॉमर दुनियेला आज देखिल पुन्हा आठवल्या शिवाय रहात नाहीत. कारण ते आहेत काळाच्या पडद्यावर कोरुन ठेवलेले अप्रतिम साज.....

        असच एकदा "दो आखें बारह हाथ" हा- ग.दी. माडगुळकर लिखित व्ही. शान्ताराम यांचा चित्रपट पहात होतो. कुठेतरी वाचल होत चांगला आहे म्हणुन. पण डोळ्यांना रंगीत ग्ल्यॉमरची सवय, आणि ब्लॅकेन- व्हाइट पहाताना ते सुरुवतिलच थकले. एक ऑफिसर(व्हि.शान्ताराम) सहा कैद्यांना पुर्ववत माणसात आणुन सुधारना करन्याची हमी घेतो, व त्यांना घेउन एका ओसाड, माळरानी शेती कसन्याच्या उध्देशाने येतो. हे पहाताना खुपच बोरिंग अस् वाटलं, आता पुढे काय असेल फार तर पळुन जाण्यासाठी कैद्यांनी केलेली धडपड, मारामारी इतकेच. परन्तु शेतीची मशागत करुन दमलेले कैदी परत घरी येतात, आणि अचानक एका गायिकेच्या गाण्याचा गोड स्वर कानावर येतो.....

ओs ओss ओsओओ SSssssssss
सैय्या झूटॉ का बडा सरताज निकला..

हाय हाय... वसन्त देसाई यांचे संगीत,भरत व्यासांचे शब्द आणि लताचा सूरेल आवज.क्षणार्धात सारा थकवा कुठल्या कूठे निघुन जातो. आणि आपण आळस देत पडलो असताना उठून बसतो. संध्या या अभिनेत्रिचं सुरांच्या ठेक्यवर अंग हिन्द्कळत चालनं, आणि चालता-चालता मागे अडकवलेल्या कात्यान्च्या छडीचा आवाज. हे गाणं आपण मन्त्रमुग्ध होऊन ऎकत रहतो.. पहत रहातो.

    कंटाळा आला असतानाच एका नव्या कॅरेक्टर(चम्पा) ची एन्ट्री होते व पुढचे एपीसोड पहाण्याची ओढ लावणारा नवा खेळ सूरु होतो. हि चम्पा नेहमीच येता -जाता हे गाणं म्हणत असते,

सैय्या झूठों का बडा सरताज निकला
मुझे छोड चला, मुख मोड चला.....!

  नंतर राहुन राहुन असं वाटत की खरंच या बिच्यार्‍या चम्पाला तिचा जिवनसाथी सोडुन गेला असेल का?
आणि का बरं गेला असेल? आपल्या जिवलग प्रेयसीला असं एकाकी सोडून जाणं म्हणजे किती यातनमय आहे,
हे त्याला का कळू नये का? इत्यादी. 
        
          परंतू वसंत देसाई यांचे संगीत मात्र ऎकणार्याच्या काणाला भुरळ पाडते. ते अधिक-अधिक ऎकावेसे वाटत
रहाते. ग. दी. माड्गुळकराचा हा हिंदीतील पहीलाच सिनेमा त्यांनी आपल्या लेखणीने सहज यशस्वी केला आहे. 



------ S.V.Godase Blogger Widget