बालम की गलीमें। ....!

हां .. ये रस्मेंss  ये कसमें सभी तोड के,
तू चली आ चुनर प्यारकी ओढ़के।
या चला ...जाऊंगा.... मैं ये जग छोडके।

   सात्विक प्रेमाने भरलेल्या -हृद्याच्या एका खोल खोल तळापासून आलेली ही हाक. संवेदनशील मनाला भावव्याकुळ केल्याशिवाय राहत नाही . हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे ज्यानी बॉलीवुडच्या दुनियेला पुराणी यादें म्हणून तीन हजाराहुन अधिक गाणी दिली.  आणि दर्दभरा स्वर ज्याच्या प्रवाहात ऐकणारा प्रत्येकजण पूर्णपणे नाहून निघेल. तो म्हणजे मुकेश यांचा. (चित्रपट - कटिपतंग )       


 जिस जगा याद तेरी सताने लगे,
उस जगा एक पल भी ठेहराना नहीं।

जिस गलीमें तेरा घर ना हो बालमां ,
उस गलीसे हमें तो गुजरना नहीं।

  आजही बहुतेकानां वाटतं की खरच ते जुने दिवस किती सुंदर होते. पण आज ते राहील नाही . आणि माणसा -माणसातील ते सात्विक प्रेमही उरल नहीं. कोणास ठाऊक तसं झालही असेल. पण खऱ्या प्रेमाची त्या वेड लावणाऱ्या क्षणांची आणि क्षणा क्षणाला आठवण करुण देणाऱ्या खऱ्या प्रेमाची एक अस्सल अनुभूती या शब्दातच नाहीं का? त्या चोरुन भेटण्याच्या जागा, रणफूले, नदी किनारे, झाडाझुडुपांचे अाड़ोसे, आणि रात्रीचा चंद्र कोरुन येणारे निखळ चांदणे. आपल्या नकळत हे किती तरी आपल्या प्रेमाचे साक्षीदार असतात. व म्हणूनच त्या ठिकाणी आपण परत एकटेच गेलो तर एक क्षणभर देखिल थाबनं  किती मुश्कील होऊन जातं.
 या गाण्याचं पहीलं कडवं जे मला अतिशय आवडतं.

जिंदगी में कई रंग रलियां सहीं,
हर तरफ मुस्कुराती ये कलियाँ सहीं,
खूब-सू-रत बहारों की गलिया सहीं।

जिस चमनमे तेरे पगमे काटें चुबें ,
उस चमनसे हमें फूल चुनना नहीं।
जिस गलीमें............... !

 आ..हां। ... फुलांची फूलबाग असो वा सोन्याची सुवर्णनगरी, जिथे माझ्या प्रियेला किंचीतही दुःख पोहचेल अशी वाटच मला चलायची नाही. या पहिल्या कडव्यातच आनंद बक्षी यांना दाद दिल्याशिवाय रहावत नाही. या अप्रतिम निर्मितीत आणखी एक सिंहाचा वाटा म्हणजे आर. डी. बर्मन यांचा.  अतिशय अफलातून असं संगीत त्यांनी दिलं आहे. गाण्याचं प्रत्येक कडवं संपताच एक बासरी वाजते. काळजाला स्पर्श करुण जाणारी. फार व्याकुळ होतं मन तेंव्हा। .!




       
Blogger Widget

No comments:

Post a Comment

Thanks